नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण सावित्रीबाई फुले भाषण मराठी ( Savtribai Phule Speech in Marathi ) यांच्यावर भाषण पाहणार आहोत, सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला आहेत, ज्यांनी शिक्षण घेऊन केवळ समाजातील वाईट गोष्टींना पराभूत केले नाही, तर देशातील मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले या समाजसुधारक, शिक्षिका आणि मराठी कवयित्री होत्या.
सावित्रीबाई फुले भाषण मराठीत | Savtribai Phule Speech in Marathi
अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर्ग, माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो,
आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्हयातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते झाला. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी. त्यावेळी त्या निरक्षर होत्या. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्या काळी स्त्रियांनी शिकणे महापाप समजले जायचे पण जिद्दी सावित्रीबाईंनी यास न जुमानता शिक्षण घेतले. अश्या अनेक तकलिफा सहन करत त्या माऊलीने स्त्री शिक्षणाया क्या निष्ठेने चालू ठेवला. शेवटी या कम लोकांनी जोतिबांच्या वडीलांचे कान भरते. आणि सावित्रीबाईंच्या सासन्यांनी शाळा सुरू होण्याच्या वर्षाच्या आत ज्योतिबा आणि सावित्रीबाईना घराबाहेर काढले. पण हीमालयासारख्या इच्छाशक्तीपुढे असले छोटे-छोटे भुकंप टिकू शकत नाहीत.
महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इ.स. १९४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी विचारांना अनेकांनी विरोध केला. पण सावित्रीबाई मुळीच डगमगल्या नाहीत, मुलींना शाळेत शिकवायला जात असताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. शेण मारले तरीही सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. त्यांनी मुलींच्या जीवनात क्रांती केली.
त्याचबरोबर दीन-दुबळ्यांना, शेतमजुरांना, अनाथांना, विधवांना आधार दिला. त्यांनी काव्यफुले, सुबोध रत्नाकर यासारखी दर्जेदार पुस्तके लिहली. सावित्रीबाईंनी एका विधवा स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेल्या ‘यशवंत’ नावाच्या मुलाला दत्तक घेतले, अखेर १० मार्च १८९७ रोजी प्लेग पीडीत रुग्णांची सेवा करताना त्यांना प्लेग झाला, आणि वयाच्या ६६ व्या वर्षी ही थोर ज्ञानमाऊली काळाच्या पडद्याआड गेली.
आज सावित्रीबाई जरी आपल्यात नसल्या तरी त्यांचे विचार आपले रोम रोम भारून टाकतात. आज प्रत्येक मुलींने सावित्रीबाईपासून प्रेरणा घेऊन, संकटाशी दोन हात करून जीवनात यशस्वी व्हावे. समाजात योग्य बदल घडवून आणण्यासाठी नेहमी झटावे तरच सावित्रीबाईचे कार्य खऱ्या अर्थाने सफल होईल.